बकरी ईद निमित्त नाकाबंदी….. बेकायदेशीर गोवंश वाहतूक….. नाशिकरोड पोलिसांची कारवाई…..
बकरी ईद निमित्त केलेल्या नाकाबंदी दरम्यान
बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर नाशिकरोड पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे. २२ मे पासुन बेकायदेशीररित्या गायी आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध पोलीसांनी नाकाबंदी करून कठोर पावले उचलली होती. या संदर्भात अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपासून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि नागरिकांच्या तक्रारीवरून केलेल्या विशेष मोहिमेत, अशा अनेक प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. संबंधित व्यक्तीं विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पशुधन संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून १५ गायी आणि ०८ बैलांची सुटका करण्यात आली आहे. गुन्हयामध्ये वापरलेली एकुण ६ पिकअप वाहने जप्त करून १५ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी गोशाळेमध्ये पाठविण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पशुधन वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या नसणे, तसेच पशुधनाचा छळ होईल अशा अयोग्य पद्धतीने वाहतूक करणे हे गंभीर गुन्हा आहे. यामुळे केवळ पशुधनाचा छळ होत नाही तर सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असुन दोर्षीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नाशिक शहरामधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कामांना पाठिंबा देऊ नये, अशा प्रकारची माहिती असल्यास तात्काळ नाशिक पोलीस जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक संदिप पवार, पोलीस उप निरीक्षक राहुल काकडे, गणेश हिरे, अविनाश देवरे, विजय टेमगर, संदिप पवार, विष्णु गोसावी, अनिल पवार, नंदकुमार भोळे, अनिल मोरे, चापोह अरूण हाडस, प्रविण बोडके, बाळकृष्ण सोनवणे, सचिन सगळे, अंबादास केदारे, नितीन भामरे,नाना पानसरे, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, अरूण गाडेकर, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, संतोष पिंगळ, चापोशि लक्ष्मण पानसरे, योगेश रानडे आदींनी केली आहे.