मालेगाव

पांझरापोळ संस्था पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात

शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पांझरापोळ संस्थेच्या जागेलगत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर थाटलेली अतिक्रमणे काढण्याऐवजी, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा नावाने त्या जागी आणखी नवीन गाळे बांधण्याचा घाट महानगरपालिकेतर्फे घालण्यात आल्याचा गंभीर आरोप पांझरापोळ संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ वर्षांपूर्वी यासंदर्भात दिलेले आदेश धाब्यावर बसवून महापालिका प्रशासन मनमानी […]

इगतपुरी

रखडलेल्या बिलांसाठी संतप्त ठेकेदारांकडून रास्ता रोको आंदोलन

इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या गावांमध्ये ठेकेदारांनी दळणवळणासाठी स्व खर्चाने रस्ते बनवले. त्या मार्गाने सुरळीत वाहतुकही सुरु झाली. मात्र २०२३ पासून त्या सर्व कामांची बिले अदा झालेली नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांना कर्जाचा डोंगर घेऊन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तयार केलेले रस्ते हे ठेकेदारांनी स्वखर्चाने कर्जबाजारी होऊन केलेले असून शासनाने अद्याप त्यापोटी बिल दिले नाही. म्हणून आज […]

त्र्यंबकेश्वर

एन्ट्री गावकऱ्याची, दर्शन भाविकाला! त्र्यंबकेश्वरमधील ‘व्हीआयपी’ लूट उघड

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन करून देण्यासाठी काही खास दलाल अर्थात एजंट कार्यरत होते. रांगेत थांबलेल्या भाविकांशी ते संपर्क साधून जलद दर्शन करून देण्यासाठी दर निश्चित करायचे. नंतर संशयित विश्वस्त पुरूषोत्तम कडलगचे पुतणे अभिषेक व ओम कडलग यांच्याशी संपर्क साधून संबंधित भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था त्यांच्याच मदतीने करून दिली जात असत. अवघ्या काही […]

संपादकीय

अक्षय उर्जेच्या मार्गात वीज वितरण कंपनी

कोळसा खाणी व औष्णिक विजेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महावितरण कंपनीच्या लक्षात आले असावे की, कृषिपंपाची सबसिडी व सरकारी खात्यांकडील थकबाकी ही समस्या आहेच. त्याशिवाय साैरऊर्जेचा वाढता वापर भलेही ग्राहकांसाठी लाभदायक, पर्यावरणाचे रक्षण करणारा, ग्रीन एनर्जीचे ध्येय गाठणारा असला तरी कंपनीसाठी नवे संकट आहे. आधी ‘पीएम कुसुम’ योजना आणि फेब्रुवारी २०२४ पासून ‘पीएम सूर्यघर’ योजनेमुळे हजारो, […]

संपादकीय

कमी पावसाचा अंदाज

कृष्णानंद होसाळीकर ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ हवामानशास्त्राच्या भाषेत, सरासरीच्या ९० ते ९५ टक्के दरम्यान पडणारा पाऊस “बिलो नॉर्मल” म्हणून ओळखला जातो. देशाची दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमान सुमारे ८७ सेंमी आहे, आणि यंदा त्याच्या सुमारे ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस “नॉर्मल” मानला जातो, तर ९० टक्क्यांखालील पाऊस “डेफिशियंट” म्हणून गणला […]

संपादकीय

सिलिंडरसाठी दुकानांसमोर मोठमोठ्या रांगा

अॅड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक पश्चिम आशियातील इराण, अमेरिका व इस्रायल यांच्यामधील युद्धामुळे भारताची तेलवाहू जहाजे अडकून पडल्याने देशातील ‘एलपीजी’चा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे देशात ‘एलपीजी’ सिलिंडर उपलब्धेची परिस्थिती चिंताजनक असून, सर्वसामान्य ग्राहकांनी ‘एलपीजी’ सिलिंडरचा वापर जपून करावा, तसेच पर्यायी इंधन म्हणून ‘पीएनजी’ जोडणी, इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगड्यांचा विचार करावा, असे आवाहन केंद्र सरकारने […]

संपादकीय

सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार हा नागरिकांचा शेवटचा अधिकार

दीप्ती देशमुख उपमुख्य उपसंपादक पश्चिम आशियातील युद्धसंघर्षात मृत्युमुखी पडलेल्या एका भारतीय खलाशाच्या पार्थिवाची ओळख पटविण्याचा प्रश्न अलीकडे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दु:खाने खचलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाला शेवटचा निरोप देता यावा, यासाठी न्यायालयाने त्याच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याचे निर्देश दिले. सरकारने सुपूर्द केलेले अवशेष खरोखर त्याच व्यक्तीचे आहेत का, याची खात्री झाल्यानंतरच कुटुंब अंत्यसंस्कार करणार आहे. मात्र, […]

राजनिती

“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते. उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषद सदस्य झाले. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता […]

राजनिती

“गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने…”; आदित्य ठाकरेंचा निशाणा

गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरलेले महिला आरक्षणाशी संबंधित संविधान (१३१वी दुरुस्ती) विधेयक केंद्र सरकारला लोकसभेत शुक्रवारी मंजूर करून घेता आले नाही. २१ तासांच्या चर्चेनंतर या विधेयकावर झालेल्या मतदानात बाजूने २९८ व विरोधात २३० मते पडली. घटनादुरुस्ती विधेयक संमत होण्यासाठी सभागृहातील सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश मते मिळणे आवश्यक होते; पण तो आकडा सत्ताधाऱ्यांना गाठता आला नाही. […]

राजनिती

“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिलांना बसला. या साऱ्या घटना २१व्या शतकातील महिला पाहात आहेत आणि त्या योग्यवेळी उत्तर देतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. या टीकेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान […]