शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पांझरापोळ संस्थेच्या जागेलगत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर थाटलेली अतिक्रमणे काढण्याऐवजी, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा नावाने त्या जागी आणखी नवीन गाळे बांधण्याचा घाट महानगरपालिकेतर्फे घालण्यात आल्याचा गंभीर आरोप पांझरापोळ संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ वर्षांपूर्वी यासंदर्भात दिलेले आदेश धाब्यावर बसवून महापालिका प्रशासन मनमानी […]

