जळगाव

“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत

अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, सरकारने आणि पालकमंत्र्यांनी तातडीने संवेदना व्यक्त केल्या पाहिजे. मात्र तसे दिसत नाही, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, मात्र तशी सरकार पावले उचलत असल्याचे दिसत नाही, सरकार असंवेदनशील आहे. चोवीस तास राजकारण करणारे कुठे आहेत. संकट मोचक गिरीश महाजन, ते केवळ राजकीय संकट मोचक आहेत का? शेतकऱ्यांच्या वेळी कुठे आहेत, आमदार […]

जळगाव

शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला आला बिबट्या, मुक्ताईनगरमध्ये धांदल, तब्बल तीन तासांनंतर जेरबंद

मुक्ताईनगर (जि. जळगाव) – मुक्ताईनगर शहरात रविवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ वाजता चक्क बिबट्या आढळून आला. शहरात एकच खळबळ उडाली. वनविभागाचे पथक रेस्क्यू ऑपरेशन करीत असताना त्यांची बिबट्याशी झटापट झाली. झटापटीतच त्याला इंजेक्शन देत तीन तासांनंतर जेरबंद करण्यात आले. – रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विश्रामगृहाच्या डायनिंग […]

सिंधुदुर्ग

वाळू माफियांचा ‘खेळ खल्लास’, प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ खास; रात्रभर चाललेल्या मोहिमेत १५ वाहने जप्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वयाची भूमिका बजावत एका अत्यंत नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अवैध वाळू उपसा आणि […]

रायगड

‘तिसऱ्या मुंबई’साठी भू-संपादन सुरू, एमएमआरडीए ऑनलाइन पद्धतीने घेणार जमीन मालकांची संमती

मुंबई – अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी जमीन मालकांची संमती घेण्याची प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू केली जाणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. अटल सेतू प्रकल्पाच्या नवी मुंबई बाजूकडील प्रभाव क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील उरण, […]

रत्नागिरी

डंपरला विजेच्या तारेचा स्पर्श, चालकाचा जागीच मृत्यू; दापोलीतील घटना

दापोली : डंपरला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याचे चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात घडली. अश्फाक हुसेन अराई (६०, रा. ताडील माेहल्ला, दापाेली) असे या चालकाचे नाव आहे. दापोली शहरातील माैजे दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात रस्त्याच्या कामासाठी डंपरच्या साहायाने मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. […]

मुंबई शहर

मुंबई पोलिस इतके असहाय कसे? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई – पाली विभागाला अनुदानित दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये गेले कित्येक महिने आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खूला हटविण्यात पोलिस अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस इतके असहाय कसे? असा सवाल गुरुवारी केला. मुंबई विद्यापीठातील पाली भाषा विभागाचे संवर्धन आणि वसतिगृहाच्या मागणीसाठी संशोधक विद्यार्थी तथा बौद्ध भिक्खू भंते विमांसा (राजेश बलखंडे) यांनी सप्टेंबर २०२५ […]

मुंबई उपनगर

आता लक्ष अक्षय्य तृतीयेकडे, कोट्यवधींची गुंतवणूक अडकली; ऑफर्सवर भर

घरांना ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विविध ऑफर्सच्या माध्यमातून विक्री वाढवण्यासाठी आता विकासकांचे लक्ष अक्षय्य तृतीयेकडे लागले आहे. विकासकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकली असून, शिल्लक घरे विकण्यासाठी विकासकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सिडकोच्या मास हाैसिंग योजनेमुळे खासगी प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे. परवडणाऱ्या दरात घरे, पारदर्शक प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्धता […]

पालघर

पालघरची विजेची चिंता मिटली

बाभळेश्वर-कुडूस ४०० केव्ही हा वीजवाहिनी प्रकल्प गुरुवारी पूर्ण झाला असून, ही वीजवाहिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सक्षम, स्थिर होणार असून, या वाहिनीवरून सुमारे ३ हजार मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीजवहन क्षमता उपलब्ध होणार आहे. त्याचा मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना फायदा होणार असून या वाहिनीमुळे महामुंबईत आता ब्लॅक आऊट होणार नाही, असे महापारेषणकडून […]

ठाणे

खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

नाशिक-मुंबई महामार्गावर कळवा येथील खारेगाव टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती आणि पाठीमागे बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कल्पेश रेवाळे (३०) आणि मीनाक्षी रेवाळे (३१, रा. भांडुप) अशी मृत पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी कळवा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश आणि […]