मुंबई उपनगर

आता लक्ष अक्षय्य तृतीयेकडे, कोट्यवधींची गुंतवणूक अडकली; ऑफर्सवर भर

घरांना ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विविध ऑफर्सच्या माध्यमातून विक्री वाढवण्यासाठी आता विकासकांचे लक्ष अक्षय्य तृतीयेकडे लागले आहे. विकासकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकली असून, शिल्लक घरे विकण्यासाठी विकासकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

सिडकोच्या मास हाैसिंग योजनेमुळे खासगी प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे. परवडणाऱ्या दरात घरे, पारदर्शक प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्धता यामुळे ग्राहक सिडकोकडे वळले आहेत. त्याचबरोबर व्याजदरातील चढ-उतार, रोजगाराची अनिश्चितता आणि गुंतवणुकीवरील परतावा यासारख्या कारणांमुळे ग्राहक आता घर खरेदीबाबत अधिक सावध वविचारपूर्वक निर्णय घेत आहेत. त्यामुळे बाजारातील मागणी घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *