बाभळेश्वर-कुडूस ४०० केव्ही हा वीजवाहिनी प्रकल्प गुरुवारी पूर्ण झाला असून, ही वीजवाहिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सक्षम, स्थिर होणार असून, या वाहिनीवरून सुमारे ३ हजार मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीजवहन क्षमता उपलब्ध होणार आहे. त्याचा मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना फायदा होणार असून या वाहिनीमुळे महामुंबईत आता ब्लॅक आऊट होणार नाही, असे महापारेषणकडून सांगण्यात आले.
महापारेषणकडून बाभळेश्वर-कुडूस या वीजवाहिनी प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून हा पंधरा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. २०१० मध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडमार्फत करण्यात आली. सुरुवातीला २०१३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. पण नवी वीजवाहिनी पुणे जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या रेडिओ दुर्बिणीच्या परिसरातून प्रकल्प मार्ग जात असल्याने विशेष परवानग्या घ्याव्या लागल्या, असे पारेषणकडून सांगण्यात आले.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
