बिटको महाविद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त डॉ. राजेंद्र जाधव यांचे व्याख्यान….
” दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा सन १८९४ पासून सुरुवात झाली. या स्पर्धाद्वारे आरोग्य आणि शांततेचा संदेश देते. ऑलिम्पिक खेळाच्या माध्यमातून एकता, आरोग्य आणि शांतता मिळते. विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली मिळून खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व्हावा त्यासाठी नियमित आहार व्यायाम करा. मोबाईल टीव्ही पासून लांब रहा. पुरेशी झोप घ्या. तीन तास खेळासाठी द्यावा ” असे मार्गदर्शन करताना राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडु व प्रशिक्षक डॉ. राजेंद्र जाधव यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय वतीने २३ जुन रोजी जागतिक ऑलिम्पिक दिना निमित्त प्राचार्य डॉ कृष्णा शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये आयोजित झालेल्या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी ऍड. दिलीप गायधनी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रागिणी भवर, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, क्रीडाशिक्षक योगेश शिंदे, श्री. बी. जी. आव्हाड, श्री.योगेश महाजन, राहुल पाटील, मीना शिंदे, सुहास माळवे, विठ्ठल कोठुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत रागिणी भवर यांनी केले.
तसेच ऍड. दिलीप गायधनी यांनी आपले अनुभव कथन करून विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.यावेळी विविध स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंदे यांनी केले तर आभार मीना शिंदे यांनी मानले.