पालघर

पालघरची विजेची चिंता मिटली

बाभळेश्वर-कुडूस ४०० केव्ही हा वीजवाहिनी प्रकल्प गुरुवारी पूर्ण झाला असून, ही वीजवाहिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सक्षम, स्थिर होणार असून, या वाहिनीवरून सुमारे ३ हजार मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीजवहन क्षमता उपलब्ध होणार आहे. त्याचा मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना फायदा होणार असून या वाहिनीमुळे महामुंबईत आता ब्लॅक आऊट होणार नाही, असे महापारेषणकडून […]

ठाणे

खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

नाशिक-मुंबई महामार्गावर कळवा येथील खारेगाव टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती आणि पाठीमागे बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कल्पेश रेवाळे (३०) आणि मीनाक्षी रेवाळे (३१, रा. भांडुप) अशी मृत पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी कळवा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश आणि […]