देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत गुपचूप वाढ केली आहे. कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय अशा ८४ दिवसांच्या प्लॅनची किंमत वाढवली असून, काही स्वस्त प्लॅन्स बंद करून ग्राहकांसमोर महागड्या रिचार्जचाच पर्याय ठेवला आहे. यामुळे सर्वसामान्य मोबाईल युजर्सचे बजेट कोलमडणार आहे.
एअरटेलचा जो प्लॅन आधी ८५९ रुपयांना मिळत होता, त्यासाठी आता ग्राहकांना ८९९ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच थेट ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. किंमत वाढली असली तरी ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या प्लॅनमध्ये आजही दररोज १.५ GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS मिळतात. याचबरोबर कंपनीने ७९९ रुपयांचा आपला स्वस्त प्लॅन पोर्टफोलिओमधून हटवला आहे. यामुळे कमी किमतीत जास्त वैधता शोधणाऱ्या ग्राहकांची अडचण झाली आहे.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

